Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 4/4/2022
देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला स्वतःहूनच उभारी घेण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे का? एका एका राज्यातून हळूहळू काँग्रेस नाहीशी का होतेय? ३३ वर्षांपूर्वी ज्या राज्यसभेत १०० पेक्षा खासदार होते, तिथे काँग्रेस अस्तित्वाची लढाई का लढतेय? असे एक ना अनेक प्रश्न काँग्रेसच्या भवितव्याकडे पाहिलं की निर्माण होतात. २०१४ ला मोदी लाटेत काँग्रेसचा असा सुपडासाफ झाला, ज्यात लोकसभेच्या एकूण १० टक्केही जागा मिळवता आल्या नाही. यानंतर अनेक राज्यातून काँग्रेस हद्दपार झाली. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा तेच हाल झाले. संसदीय कार्यप्रणालीत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या राज्यसभेत काँग्रेसची जी अवस्था झालीय, ती पक्षाच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.संसदेत लोकसभा आणि राज्यसभा ही दोन सभागृह आहेत. लोकसभेचे खासदार थेट जनतेतून निवडून जातात, तर राज्यसभेतले खासदार ज्या त्या राज्यातल्या आमदारांकडून निवडले जातात.

Category

🗞
News

Recommended