• 3 years ago
गढूळ पाण्यासाठी विहिरीत जीवघेणी कसरत करत , रस्ता नसल्यानं बाळंतीणीचीही फरफट, पाण्याच्या टंचाईमुळे पोरा-बाळांना अंघोळ नाही त्यामुळे शाळेत शिक्षक शाळेत बसवत नाही... एक ना अनेक अडचणी अडचणी कसल्या खरतर हे भयाण वास्तव आहे.. जे या आदिवासी महिलांच्या नशिबी आलं आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर . या भागात आजही म्हणावा तसा विकास नाही. ना पाण्याची सोय नाही रस्त्याची. आता हेच बघा ही महिला हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरताना दिसतीये,बर सुरक्षा म्हणून या महिलेकडे काहीही नाहीये. पाण्यासाठी आसुसलेला जीव शांत करण्यासाठी जीवाची बाजी लावायची,. देव न करो पण खाली उतरताना किंवा चढताना हात सुटला तर... काय होईल? मात्र करणार काय या गावातील महिलांचा हा नित्यक्रम झालाय. या भीषण वास्तवाकडे पाहाण्याचा या महिलांचा दृष्टीकोण अगदी रोजचाच आणि शासनाची नजर अजून फिरकलीच नाही. तर मुख्यमंत्र्यांची पेयजल योजना कशी पोहोचेल.बर ती योजना आहे की नाही त्याबद्दल या महिलांना माहितही नसेल. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मेटघर . या भागात आजही म्हणावा तसा विकास नाही. ना पाण्याची सोय नाही रस्त्याची. आता हेच बघा ही महिला हंडाभर पाण्यासाठी खोल विहिरीत उतरताना दिसतीये,बर सुरक्षा म्हणून या महिलेकडे काहीही नाहीये. पाण्यासाठी आसुसलेला जीव शांत करण्यासाठी जीवाची बाजी लावायची,. देव न करो पण खाली उतरताना किंवा चढताना हात सुटला तर... काय होईल? मात्र करणार काय या गावातील महिलांचा हा नित्यक्रम झालाय. या भीषण वास्तवाकडे पाहाण्याचा या महिलांचा दृष्टीकोण अगदी रोजचाच आणि शासनाची नजर अजून फिरकलीच नाही. तर मुख्यमंत्र्यांची पेयजल योजना कशी पोहोचेल.बर ती योजना आहे की नाही त्याबद्दल या महिलांना माहितही नसेल.

Category

🗞
News

Recommended