• 3 years ago
८१ वर्षांचे शरद पवार राज्यभर दौरे करतात, प्रत्येक नेत्यासोबत स्वतः बोलतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना भाजपच्या खासदार आणि आमदारांना बैठक बोलवून चर्चा करतात, धोरणं आखतात. पण यात काँग्रेस कुठे आहे हे त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनाही समजेनासं झालंय. असं म्हणायंच कारण म्हणजे १३ दिवसांपूर्वी काँग्रेसच्या २५ आमदारांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहिलं. आमदारांची नाराजी जगजाहीर होती. या आमदारांनी भेटण्यासाठी दिल्लीही गाठली. पण सोनिया गांधींची वेळ मिळण्यासाठीही त्यांना प्रतिक्षा करावी लागली. हायकमांड आपलं ऐकतच नसेल तर या नेत्यांनी पक्षासाठी जीव ओतून काम का करावं, मोदी आणि पवारांच्या वेगवान राजकारणाने काँग्रेसला पूर्णपणे धोबीपछाड दिलीय का आणि सर्वात महत्त्वाचं, देशभरात सुपडासाफ झालेला असतानाही काँग्रेसचं हायकमांड कल्चर नाराजांचं म्हणणं ऐकणार का..

Category

🗞
News

Recommended