ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण… | Devendra Fadanvis

  • 2 years ago
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोकणात येणारी रिफायनरी ग्रीन रिफायनरी असेल. काहीही झालं तरी कोकणात एकही प्रदुषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही. ग्रीन रिफायनरी आणि इमिशन-डिस्चार्ज नाही असे नवीन तंत्रज्ञानाचे उद्योगच कोकणात आणू. याशिवाय त्यांच्यावर एक अट टाकली होती की, जिथं रिफायनरी होईल तिथं त्याच परिसरात ५,००० एकरावर फक्त ग्रीनरी तयार करावी लागेल.”“या प्रकारच्या रिफायनरीमुळे कोकणातील एक लाख लोकांना थेट रोजगार आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. काही लोकांनी खूपच चुकीच्या गोष्टी पसरवल्या. ते म्हणाले रिफायनरी प्रकल्प झाल्यावर आंबाच येणार नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

#DevendraFadanvis #kokanrefinary #UddhavThackeray #SanjayRaut #AadityaThackeray #Shivsena #Constitution #Maharashtra #Politics #hwnewsmarathi

Recommended