ही तर आणिबाणीची आठवण : अर्णब गोस्वामींच्या अटकेबाबत चंद्रकांत पाटील

  • 3 years ago
राज्यातील महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल आणि चुकांबद्दल जाहीर सवाल करणारे पत्रकार अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकरवी अटक करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला आहे. ठाकरे सरकारची ही कृती आणीबाणीबातील दडपशाहीची आठवण करून देणारी आहे. भारतीय जनता पार्टी या दडपशाहीचा निषेध करते, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आज त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावेळी सरकावर टीका केली.

Recommended