‘हे सरकार पुढील २० वर्ष टिकणार‘; Ramdas Athawale यांचा दावा

  • 2 years ago
‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकार (सत्ता) बदलण्यात एक्सपर्ट आहेत. त्यामुळं हे सरकार पडेल या अफवांवर विश्वास ठेवू नका. पुढील २० वर्ष हे सरकार पडणार नाही‘ ,असा विश्वास केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलत होते