Jitendra Awhad:'शरद पवारांनी ठरवलं असतं तर...'; आव्हाडांनी सांगितला Anand Dighe यांचा किस्सा

  • 2 years ago
राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना ठाण्यातील राजकारणावर भाष्य केले. यावेळी त्यांनी शरद पवार आणि आनंद दिघे यांच्यातील राजकीय मैत्रीचा एक किस्सा सांगितला आहे. आनंद दिघे यांच्यावर जेव्हा ‘टाडा’ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आनंद दिघेंना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली. पवारांनी मदत केली नसती, तर आनंद दिघे कधीच ‘टाडा’च्या बाहेर आले नसते, असं विधान जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. ते ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते

Recommended