शिवसंग्राम संघटनेचे उठबशा आंदोलन
तूर खरेदीच्या या ज्वलंत प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेने भाजप सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमची "मन की बात' शेतकऱ्यांनी मनावर घेत तूरीचे विक्रमी उत्पादन घेतले. ती आमची चुक मान्य करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करित उठबशा आंदोलन केल्याचे शिवा मोहोड यांनी सांगितले. आता तुमची "मन की बात' आम्ही मनावर न घेता फक्त कानावर घेऊ, असा इशारा देत तूर खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसंग्रामचे नेते शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात आकाश शिरसाट, गोपाल देशमुख, सुनिल खेडकर, तेजराव सोळंके, अभिषेक खंडारे, गोपाल सांगुनवेढे, प्रविण चतरकर, अन्नासाहेब पवार, अभिजीत ढोरे आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठबशा आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
Category
🗞
News