Amravati: पगारवाढीसाठी कर्मचाऱ्यांचा एल्गार; कामबंद आंदोलन

  • 3 years ago
तिवसा (जि. अमरावती) : जिल्ह्याच्या नांदगाव पेठ येथील औद्योगिक परिसरात असलेल्या श्याम इंडो कंपनीतील कर्मचाऱ्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. कंपनीकडून ३० सप्टेंबरपर्यंत पगार वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कुठल्याही कर्मचाऱ्यांची पगार वाढ झाली नसल्याने एक ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या गेट समोर ठिय्या मांडला आहे. श्याम इंडो कंपनीकडून सहा वर्षांपासून कुठल्याही कर्मचाऱ्याला एक रुपयाही पगारवाढ देण्यात आली नसल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीविरोधात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत पगार वाढ मिळणार नाही तोपर्यंत कंपनीतील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. (व्हिडिओ - प्रशिक मकेश्वर)
#amravati #amravatinews #amravatiliveupdates #workerssalary

Category

🗞
News

Recommended