Karad: शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न : पालकमंत्री

  • 3 years ago
#karad #satara #maharashtraband #karadnews #balasahebpatil
कऱ्हाड (सातारा) : लखीमपूर घटनेच्या (Lakhimpur Kheri) निषेधार्थ महाराष्ट्र सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला (Maharashtra Band) चांगला प्रतिसाद मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील जनतेने मनापासून या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनी दिली. दरम्यान, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान पत्करलं. तो लढा इंग्रज, परदेशीयांविरोधात लढा होता. मात्र, देशातील जनतेला स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा देत असतानाही इंग्रजापेक्षा अमानुष प्रकार करण्याचे प्रकार वाढले आहेत, असा आरोपही मंत्री पाटील यांनी केला. (व्हिडिओ : हेमंत पवार)

Recommended