तुर, हरभरा पिकांवर थंडीचा परिणाम; शेतकरी त्रस्त | Wardha Farmer Issues | Crop | Farming Agriculture

  • 2 years ago
महाराष्ट्रात सतत होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी चिंतेत आहे. वाढत्या थंडी आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल दिसुन येत आहे. वाढत्या थंडीमुळे व धुक्यामुळे तूर व हरभरा पिकावर परिणाम झाला आहे. दिवसेंदिवस थंडीचे प्रमाण वाढत असल्याने तुर, हरभरा पीक धोक्यात आले आहे. आधीच पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे आणि त्यात थंडीची भर पडल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.

#Wardha #Farmer #ClimateChange #UnseasonalRain #GlobalWarming #Winter #Maharashtra #Fog #ToorDal #GramSeed #Farming #Crop #Seeds #AbdulSattar #Agriculture

Recommended