"ज्यांनी चुका केल्या ते..."; अजितदादांनी सत्ताधाऱ्यांना काढला चिमटा | Ajit Pawar

  • last year
आठ महिन्यापूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झालं. त्याचे पडसाद अद्यापही उमटताहेत. काही दिवसांपूर्वीच प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना एका वृद्ध नागरिकाने अडवून तुम्ही उद्धव ठाकरेंना का सोडलं, गद्दारी का केली?, असा जाब विचारला होता. तर खासदार धैर्यशील माने यांचीही अशीच नागरिकांनी अडवणूक केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. हाच धागा पकडत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी
सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.#ajitpawar #sharadpawar #bacchukadu #congress