आत्तार दाम्पत्याचा अनोखा उपक्रम चिमण्यांसाठी ठरतोय वरदान
पक्षी आणि प्राणी हे निसर्गाचे अनमोल खजिने आहेत. पण वाढत्या प्रदूषण आणि माणसांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत. पक्ष्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याने इस्लामपूर येथील पक्षीमित्र आष्पाक आत्तार आणि त्यांच्या पत्नी गुलजार आत्तार यांनी चिमणी आणि पक्षांसाठी अन्नपाण्याची तजवीज केली आहे. त्यांचा हा उपक्रम पक्ष्यांसाठी वरदान ठरत आहे.
Category
🗞
News