• 2 years ago
बारावीच्या लेखी परीक्षेत थोडा बदल करण्यात आला आहे. पुणे विभागासाठी भाषा विषयाच्या प्रश्नपत्रिका आणणाऱ्या ट्रक ला अचानक बुधवारी आग लागली. त्यात 250 लाख प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याचे सांगण्यात येत आहे. पाच आणि सात मार्च ला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार आहे. बाकीच्या पेपरचे नियोजनात कुठला ही बदल नाही असं सांगण्यात जात आहे. तसेच दहावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

Category

🗞
News

Recommended