• 2 years ago
रशिया-युक्रेनच्या युद्ध परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करीत आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांपैकी 218 विद्यार्थ्यांचं विमान मुंबईत दाखल झाले. केंद्रीय मंत्री पियुष गोयल तसेच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले. विद्यार्थ्यांना घेण्यासाठी विविध ठिकाणाहून पालकही विमानतळावर दाखल झाले होते. शिक्षणासाठी गेलेले जवळपास दीड हजार भारतीय विद्यार्थी यूक्रेनमध्येच अडकून पडले आहेत.

Category

🗞
News

Recommended